September 17, 2026
लोगोकथा : पार्ले-जी
August 6, 2026
वाचनव्रत - माझ्या कथेचे अभिवाचन
लेखन
आणि अभिनय यात कमालीची व्यग्र असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका मुग्धा
गोडबोले अनेक उपक्रमही चालवते. त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे
"वाचनव्रत". Screen entertainment चा भडीमार होत असताना लोकांना परत
पुस्तकांच्या वाचनाकडे वळवण्यासाठी तिने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
मुग्धा माझी, आजच्या भाषेत सांगायचं, तर "favourite person" आहे
"कथापौर्णिमा" या माझ्या कथासंग्रहाचे प्रकाशन मुग्धाच्या हस्ते व्हावे
अशी माझी फार इच्छा होती. काही कारणाने तिला जमले नाही. पण माझ्या आयडॉल
आणि मुग्धाची आई, ज्येष्ठ साहित्यिका मंगलाताई गोडबोले यांच्या हस्ते
"कथापौर्णिमा"चे प्रकाशन झाले, असा दुधात केशर योग तेव्हा आला ![]()
![]()
मुग्धाला
"कथापौर्णिमा" देता आले नाही याची रुखरुख तेव्हापासून होती. पण आनंदाची
गोष्ट अशी, की तिच्या "वाचनव्रत" या उपक्रमात मला "कथापौर्णिमा" मधल्या एका
कथेचे वाचन करण्याची संधी तिने मला उपलब्ध करून दिली
त्या कथावाचनाची लिंक खाली दिली आहे. जरूर ऐका. अभिप्राय तिथे लिहा आणि इथेही कळवा.
आणि, कथा ऐकून "कथापौर्णिमा" घ्यावेसे वाटले, तर माझ्याशी कधीही संपर्क साधू शकताच! ![]()
July 29, 2026
गुरुपौर्णिमा
ज्यांच्यावर गुरूकृपा झालेली आहे, ते भाग्यवान असतात!
माणसांच्या या अथांग सागरात काही मोजक्या लोकांवरच खऱ्या अर्थाने भगवंताची/ अध्यात्मिक गुरूची अथवा एखाद्या ऋषीतुल्य व्यक्तीची कृपा होते. भले गुरूंना लाखो शरण जाऊदेत, पण आपल्या छत्राखाली घेण्याच्या पातळीचं कोण आहे, याचा निर्णय गुरूंचाच असतो! जे खरे गुणवंत असतात, त्यांच्यावरच गुरुकृपा होते. आणि त्यानंतर आनंदीआनंद! त्यांच्या साऱ्या चिंताच मिटतात! खांद्यावरचं चिंतांचं, अपेक्षांचं, परिपूर्तीचं ओझं गुरूंच्या सहज स्वाधीन करता येतं. पुढचा मार्ग गुरूच दाखवतात.
सुयोग्य गुरू लाभणं, आणि त्यांनी आपल्याला स्वीकारणं यासाठी खचितच पूर्वपुण्याई लागत असणार. कारण, ही कृपा प्रत्येकावर होत नाही.
गुरुंच्या कृपाछत्राखाली असण्याची भावना किती सुखद असते! कोणत्याही प्रश्नाचं, समस्येचं, त्रासाचं उत्तर मागण्यासाठी गुरूंकडे जाता येतं, मानसिक द्वंद्व असेल, उलथापालथ होत असेल, भावनांचा निचरा करायचा असेल, वाट चुकली असेल… गुरूंना शरण जाता येतं. तिथे सगळा अहंकार गळून पडतो, उकल होत जाते, गुंता सुटत जातो, उत्तरं मिळायला लागतात. ’मला कोणाची गरज नाही, मी स्वयंपूर्ण आहे, मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही’ अशा या मी-पणाच्या काळात गुरूंचं केवळ ’असणं’ किती आधार देतं याची कल्पनाच अहंकारी, मूढ व्यक्तींना येणार नाही. They don’t know what they are missing. They should take time to reflect, at least today.
म्हणून, गुरुपौर्णिमा महत्त्वाची, कारण गुरुविण नाही दुजा आधार!


